Agriculture Insurance In India
Agriculture Insurance In India दरम्यान, पेरणी न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यातील सुमारे २६ हजार शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत धाराशिव, अकोला, परभणी, जालना नागपूर, अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे १२ लाख ८६ हजार १८५ शेतकऱ्यांना ६१३ कोटी १९ लाख रुपयांची नुकसानभरपाई येत्या दोन दिवसांत दिली जाणार आहे.
रेशन कार्ड प्रकार, पात्रता, कागदपत्र आणि अर्ज
तर नाशिक, जळगाव, नगर या जिल्ह्यांसाठी सुनावणी झाली असून येथील विमा कंपन्यांनी सोयाबीन, मका, बाजरी या पिकांचे दावे मान्य केले आहेत,
तर कापूस व अन्य पिकांच्या दाव्यांवर आक्षेप घेतला आहे. पुणे जिल्ह्यात सर्वच पिकांच्या संदर्भात विमा कंपनीने आक्षेप घेतला आहे.
चार जिल्ह्यांत आक्षेप नाही
- Agriculture Insurance In India छ. संभाजीनगर जिल्ह्यामधील मका व सोयाबीन पिकाचे दावे मान्य करण्यात आले असून, कापूसाचा दावा मात्र अमान्य केला आहे. राज्यस्तरावर सुनावणी होणार आहे.
- सांगली, कोल्हापूर, परभणी, नागपूर या जिल्ह्यांत कंपन्यांकडून आक्षेप घेण्यात आले नव्हते.
- मात्र, यादी अंतिम होण्यास २ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2023
पेरणी न झाल्याने पुणे, सांगलीत भरपाई Agriculture Insurance In India
- सांगली व पुणे जिल्ह्यात खरिपात पुरेसा पाऊस न झाल्याने पेरणी होऊ शकली नव्हती.
- सांगली जिल्ह्यातील १३ हजार १४४ शेतकऱ्यांना ७ कोटी १७ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
- तर पुणे जिल्ह्यातीत बारामती व शिरुर तालुक्यांत १३ हजार २०० शेतकऱ्यांना २० कोटी ७३ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले आहे.
बीड, बुलढाणा, वाशिमचा तिढा केंद्राकडे
- धुळे, हिंगोली, लातूर, नांदेड येथील विभागीय स्तरावरील सुनावणी पूर्ण झाली असून, कंपन्यांनी सर्वच पिकांचे दावे मान्य केले आहेत.
- शेतकऱ्यांची यादी अंतिम होऊन या जिल्ह्यांमध्ये नुकसानभरपाईचे वितरण केले जाईल.
- बीड. बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर झालेल्या सुनावणीनंतर कंपन्यांनी राज्यस्तरावर कृषी विभागाकडे आक्षेप घेतला.
टाटा कॅपिटल मार्फत 75000 ते 35 लाखांचे कर्ज फक्त 5 मिनिटांत; सोप्या 6 स्टेपमध्ये
- Agriculture Insurance In India या तिन्ही जिल्ह्यांसंदर्भात राज्यस्तरावरील सुनावणीदेखील पूर्ण झाली असून कंपन्या बहुतेक केंद्र सरकारकडे आक्षेप साद करण्याच्या तयारीत असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
- या तीन जिल्ह्यामधील नुकसानभरपाईला आठवड्याचा अवधी लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वच शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळू शकेल, अशी शक्यता आहे.