Declare Drought
Declare Drought ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंता दूर झाले असून धरणामध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाही. विक्रमी पाऊस असणाऱ्या सुरगाणा व पश्चिम पट्ट्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने पश्चिम वाहिनी नद्या वरील धरण क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने परिणामी धरणे पूर्ण क्षमतेने भरले नाही नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील समूहातील एकही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पिण्याचा पाण्याचा तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण होणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर पवार यांनी म्हटले आहे.
![Declare Drought](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
आयुष्मान कार्ड, फक्त 5 मिनीटात मोबाईलने ऑनलाईन काढा
पावसाच्या खंडामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती ?
- Declare Drought यावर्षी खरीप पेरणीसाठी आवश्यक प्रमाणात पाऊस झाला नसल्याने अत्यंत पावसावर जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरण्या केलेल्या आहे.
- मात्र पेरण्या झाल्यानंतर पुन्हा पावसात झालेल्या खंडामुळे पिके करपली असून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
- परिणामी शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला आहे.
- जिल्ह्यातील 54 मंडळामध्ये अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
- अशा चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी.
Declare Drought
- तसेच शासनाच्या आव्हानानुसार शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा काढलेला आहे.
- राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
- तरी सुद्धा परिस्थितीचे गांभीरे विचारात घेता शासनाने विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती मदत व नुकसान भरपाई देण्याबाबत निर्देश करावेत.
- तसेच ही एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा असे निवेदनही दिल्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी कळविलेले आहे.
![Declare Drought](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
या लाभार्थ्यांना मिळणार व्यवसायासाठी बिनव्याजी १ लाख