Gram Panchayat Atikraman
Gram Panchayat Atikraman अतिक्रमण काढण्या संदर्भातला महत्त्वपूर्ण जीआर आहे हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे. या जीआर चे टायटल आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या व ग्रामपंचायत च्या ताब्यातील खुल्या जागा व इमारती यांचे अतिक्रमण पासून रक्षण करण्याबाबत चा हा जीआर आहे.
![Gram Panchayat Atikraman](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
8 अ आणि 7/12 डिजिटल स्वाक्षरीचा फक्त 15rs मध्ये; असा काढा?
ग्रामपंचायतीकडे या तीन प्रकारच्या खुल्या जमिनी व इमारती ताब्यात असतात.
- जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम १०० अन्वय हस्तांतरित योजना बरोबरच योजनांची कारवाई करण्यासाठी हस्तांतरित झालेल्या इमारती व खुल्या जागा.
- पूर्वीचे जिल्हा लोकल बोर्ड यांच्याकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झालेल्या इमारती व खुल्या जागा.
- त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांनी स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेल्या जमिनी व इमारती.
- जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, यांच्या ताब्यातील खुल्या जागा व इमारती यांचे अतिक्रमण पासून रक्षण करण्यासंदर्भात,
- शासनाने संदर्भातील दिनांक 25 जानेवारी 1990 तसेच दिनांक १३ डिसेंबर 1993 रोजीच्या परिपत्रकांन्वये सूचना दिलेल्या आहे.
- असे असतानाही राज्यातील अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ताब्यातील जमिनी व इमारती यावर अतिक्रमणे झालेली असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.
- तसेच सदर अतिक्रमण दूर करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत त्वरित काळजी घेत नाही.
- किंवा सदर अतिक्रमणाची बाब खूप उशिरा लक्षात येते त्यामुळे सदर अतिक्रमणे कालांतराने दूर करणे कठीण जाते ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाचे असून.
- जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतच्या जमिनी जागा व इमारती जतन करण्याच्या दृष्टीने अत्यंत निष्काळजीपणाची आहे.
- जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम 200 अन्वये जिल्हा परिषद एस व मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम 53 नुसार ग्रामपंचायतीस असे अतिक्रमणे दूर करण्याचे अधिकार आहे.
- व त्यासाठी आवश्यकतेनुसार महसूल व पोलीस यंत्रणेची सुद्धा मदत घेता येते.
- याबाबत महसूल व वन विभागाने शासन परिपत्रक क्रमांक दिनांक ७ सप्टेंबर 2010 अन्वय सविस्तर सूचना दिलेल्या आहे.
- तसेच राज्यातील शासकीय व निमशासकीय जमिनीवरील अतिक्रमणे रोखणे व खुल्या व मोकळ्या जागांची नियमन लेखापरीक्षण करण्याबाबत,
- गृहनिर्माण विभागाच्या शासन निर्णय क्रमांक दिनांक 10 ऑगस्ट 2010 अन्वये माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरी समिती ही गठीत करण्यात आलेली आहे.
- सदर समिती राज्यातील शासकीय निमशासकीय जमिनीवरील अतिक्रमण बाबत धोरण तयार करण्यासाठी आणि बेकायदेशीर अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करण्याची शिफारशी करणार आहे.
- तर या संदर्भामध्ये शासनाने त्या काळामध्ये शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला होता हा जीआर आज सुद्धा लागू आहे. Gram Panchayat Atikraman
![Gram Panchayat Atikraman](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात आयकर परतावा अजूनही भरला नाही? आता काय करावं?
Gram Panchayat Atikraman शासन निर्णय
- भविष्यकाळात जिल्हा परिषदांना विस्तार व विकास कामासाठी जागांची अडचण बसणार आहे.
- त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जमिनी जागा व इमारती यांच्या अतिक्रमण पासून रक्षण करणे व त्यांचे जतन करणे या संदर्भात शासन खालील प्रमाणे आदेश देत आहे.
शासनाकडून देण्यात आलेला आदेश
- राज्यातील सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांनी त्यांच्या ताब्यातील मोकळ्या जमिनींचे जागांचे भू सर्वेक्षण व भूलेखा परीक्षण करावे यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा.
- सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीने त्यांकडे असलेल्या इमारतींच्या व त्या सभोवतालची मोकळी जागा तसेच खुल्या जागा यांची मालमत्ता नोंदवाहीत नोंद करावी.
- सर्व जिल्हा परिषदांनी पंचायत समित्या व ग्रामपंचायतीने त्यांच्या मालमत्ता नोंद वह्या अद्यावत ठेवाव्या.
- तसेच प्रत्येक मालमत्ते संबंधातील महसूल विभागातील व अन्य कागदपत्रे यांची पडताळणी करावी व ती व्यवस्थित आहे याची खात जमा करावी.
- जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या सार्वजनिक जागांची नकाशासह सुची तयार करून ती स्थानिक कार्यालयात ठळकपणे लावण्यात यावी.
- त्यासोबत शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात यावा.
- जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या ताब्यातील खुल्या जागा व इमारतीच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना आवश्यकतेनुसार कुंपण घालावे व मालकी बाबत स्पष्ट फलक लावावे.
- सर्व जमिनींना व जागांना कुंपण घालण्याचे काम जिल्हा परिषदेने टप्प्याटप्प्याने त्यांच्या व निधीतून करावे.
- या सर्व कामावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांची मालमत्ता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे.
- जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या ताब्यातील खुले जागा व इमारती यांची वेळोवेळी पाहणी करून आढावा घेण्यात यावा. Gram Panchayat Atikraman
![](https://i0.wp.com/krushisamrat.indienfarmer.com/wp-content/uploads/2023/07/clickhere-click-1-1.gif?resize=220%2C124&ssl=1)
Gram Panchayat Atikraman अतिक्रमण दूर करण्याचे अधिकार ?
- तसेच सदर जागेवर काही अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम 200 नुसार योग्य ती कारवाई त्वरित करून अतिक्रमण दूर करण्यात यावे.
- ग्रामपंचायतींना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम 53 नुसार असे अतिक्रमण दूर करण्याचे अधिकार आहे.
- या व्यतिरिक्त जर अतिक्रमणे झाली किंवा ती दूर करण्यास जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायती यांना यश न आल्यास महसूल विभागात व पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी.
- तसेच अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध तात्काळ पोलिसात फिर्याद दाखल करण्याबाबतही महसूल व वन विभागाने शासन परिपत्रक क्रमांक दिनांक ७ सप्टेंबर 2010 अन्वये सूचना दिलेल्या आहे.
- जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत कडील मोकळ्या जागा व इमारती यांचा जास्तीत जास्त परिणामकारक वापर तसेच योग्य पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने कारवाई अपेक्षित आहे.
- अतिक्रमणास आळा घालण्यास अपयशी ठरलेल्या संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध प्रचलित नियम व कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्त यांना असतील.
- म्हणजे या जीआरच्या अनुषंगाने अतिक्रमण काढण्या संदर्भात ग्रामपंचायतीला किंवा जिल्हा परिषदेला किंवा पंचायत समितीला पत्र लिहिले.
- आणि त्यांकडून अतिक्रमण काढण्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
- तर अशा परिस्थितीमध्ये विभागीय आयुक्त यांना अर्ज करू शकता.
- विभागीय आयुक्तांकडून संबंधित जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल व ग्रामपंचायती असेल तेथील जे अधिकारी असतील त्यांवर योग्य ती कारवाई त्यांच्यातर्फे करण्यात येते.
- जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याने असे अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन दिल्याचे निदर्शनास आल्यास.
- सदर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याची कारवाई सदर वर्तणूक ही गैरवर्तणूक समजून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 3 ( 1 ) एक व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील 39, 50 व 61 नुसार प्रचलित नियमानुसार करण्यात येईल.
- तर अशा प्रकारे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल.
- यांच्या खुल्या जागा व इमारतीवर जर अतिक्रमण झालेले असेल.
- तर त्या अतिक्रमणा संदर्भामध्ये अर्ज दिल्यानंतर समतीताना ते अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे.
- नसता विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्ज केल्यास संबंधितावर सुद्धा कारवाई ही होऊ शकते.