Maharashtra Government 28 जून 2023 रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी विविध प्रकारचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार योजनेत आणि श्रावणबाळ योजनेतील निवृत्ती वेतनात वाढ करण्यात आली आहे. याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आली होती परंतु अजून पर्यंत यावर अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती तर आता 28 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.